Jump to content

आम्ही जातो अमुच्या गावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आम्ही जातो आमुच्या गावा (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

आम्ही जातो आमुच्या गावा हा ९ ऑगस्ट १९६८ रोजी प्रसिद्ध झालेला एक मराठी भाषेतील चित्रपट आहे.हा चित्रपट कमलाकर तोरणे यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात एका प्रामाणिक उद्योजकाची कथा आहे जो, त्याच्या स्वतःच्या भागीदाराद्वारे मूर्ख बनविला जातो, तरीही त्याला तुरुंगातून पळून आलेल्या तीन कैद्यांची मदत मिळते. त्यांचे हृदयपरिवर्तन हा या चित्रपटाचा मुख्य भाग आहे.

कथानक[संपादन]

श्रीधर पंत एक प्रामाणिक आणि दयाळू उद्योजक आहे जो त्यांची पत्नी लक्ष्मी आणि कन्या वैजयंती यांच्याबरोबर आनंदाने आयुष्य जगत असतो. तथापि, श्रीधर पंत याचे भागीदार शामराव खापरतोंडे यांनी त्यांच्या विश्वासार्हतेचा फायदा घेतला. त्याने पंतांसमोर काही व्यवसायीक कर्जे पुढे आणली आणि गहाणखत म्हणून त्यांच्या मालकीच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची स्वाक्षरी घेतली. पंत जर खापरतोंडेच्या मानसिकदृष्ट्या अपंग मुलास त्याच्या मुलीशी लग्न करून देण्यास सहमत नसतील तर तो त्यांना उध्वस्त करण्याची धमकी देतो.

दरम्यान, संताजी, धनजी आणि सयाजी हे पंतच्या दारात येतात. ते पंतला समजावून सांगतात की ते प्रवासी आहेत आणि पंत त्यांना काही दिवस त्यांच्या घरी ठेवण्याची संधी देतात.खरी गोष्ट अशी आहे की हे लोक एक कुप्रसिद्ध गुन्हेगार आहेत जे तुरुंगातून पळून गेले आहेत.त्यांच्या पंतांकडे आगमनाची खरी कारणे म्हणजे पंतांची संपत्ती लुटणे ही आहेत. पण त्यांनी एकदा पंतांच्या घरात राहणे सुरू केल्यावर, पंत कोणत्या समस्येत आहेत हे त्यांना कळते.या गुन्हेगारांचे हृदय बदलते आणि ते सर्वकाही व्यवस्थित करण्याचा निर्णय घेतात.

पार्श्वभूमी[संपादन]

कलाकार[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटाचे संगीतकार सुधीर फडके आहेत.

बाह्य दुवे[संपादन]