Jump to content

रौप्य महोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रौप्य महोत्सव (silver jubilee - सिल्वर जुबली) म्हणजे २५ वा वर्धापन दिन होय. याला रजत जयंती किंवा पंचवीसवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९७२ मध्ये स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला.

रौप्य महोत्सवी वर्ष हे २४ व्या वर्धापन दिनापासून ते २५ व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.

हे देखील पहा[संपादन]